शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

हिंदुराष्ट्र संकल्पना देशाच्या एकतेला धोकादायक : इरफान इंजिनिअर, कॉ.अवि पानसरे व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:49 IST

कोल्हापूर : धर्म आणि सांप्रदायिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र धर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देधर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जातोययापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी जातीय दंगे झाले, तेथे भाजपची सत्ता आली कॉँग्रेसने मात्र ‘आम्ही सगळे भारतीय’ अशी व्याख्या मांडली.

कोल्हापूर : धर्म आणि सांप्रदायिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र धर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात अठराव्या शतकापर्यंत कधीच जातीय हिंसा, दंगली झाल्या नाहीत. ब्रिटिशांनी मात्र स्वार्थासाठी हिंदू या भौगोलिकतेवर आधारलेल्या शब्दाला धर्माचा रंग दिला आणि जातींमध्ये तेढ निर्माण केली.

आता भाजप आणि संघाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे मूल्य सांगणारी राज्यघटना नाकारून चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित हिंदुराष्ट्र निर्माण करावयाचे आहे. हिंदुराष्ट्र ही संकल्पना भारताच्या एकतेला धोकादायक आहे, अशा परिस्थितीत आपण सामाजिक न्यायासाठी दीर्घकाळ संघर्षाकरिता तयार राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत इरफान इंजिनिअर यांनी शनिवारी केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानच्या अवि पानसरे व्याख्यानमालेत त्यांनी ‘जमातवाद आणि जातीय दंगे’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी आनंद मेणसे होते. व्यासपीठावर प्रदीप निंबाळकर, ईर्शाद वडगावकर उपस्थित होते.

इंजिनिअर म्हणाले, सद्य:स्थितीत भाजप आणि संघाला भारताला सांप्रदायिक हिंदुराष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चनांना पुढे केले जात असले तरी दलित, महिला, बहुजन ही त्यांची लक्ष्ये आहेत. काँग्रेस संविधानावर आधारित देश चालवू शकते, अशी एक शक्यता असली तरी त्यांनीही सोयीनुसार सांप्रदायिकतेचे राजकारण केले आहे. अशा परिस्थितीत जनता म्हणून आपण काय करू शकतो, हा मुख्य मुद्दा आहे. ही निवडणुकीची लढाई नाही. २०१९ मध्ये कोणताही पक्ष जिंकला तरी फार फरक पडेल अशा भ्रमात राहता कामा नये. आपण आजवर बोनस, पगार, शेतमालाला हमीभाव अशा कारणांसाठी लढलो. आता त्यासोबतच सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी, महाराणा प्रताप यांनी अकबराशी केलेली लढाई अशा राजवटींच्या लढाया राजनीतीवर आधारलेल्या होत्या. आता मात्र त्यांना धार्मिकतेचा रंग दिला जात आहे. ‘भारतीय’ असा व्यापक अर्थ मांडणाºया हिंदू या शब्दाला ब्रिटिशांनी १८६१ साली जनगणना करताना जातीच्या चौकटीत बसविले आणि तेव्हापासून धर्माच्या नावावर दंगे आणि हिंसा सुरू झाली. महात्मा गांधी, मौलाना आझाद हे धार्मिक होते; पण सांप्रदायिक नव्हते; तर सावरकर आणि जिना धार्मिक नव्हते; पण सांप्रदायिक होते. कॉँग्रेसने मात्र ‘आम्ही सगळे भारतीय’ अशी व्याख्या मांडली.आनंद मेणसे म्हणाले, सामान्य माणूस कधीच जातीयवादी नसतो. ज्यांना सत्ता स्थापन करायची असते, अशा व्यक्तींकडून धर्माचे राजकारण केले जाते. प्रदीप निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ईर्शाद वडगावकर यांनी आभार मानले.तिथेच भाजपची सत्ताइंजिनिअर म्हणाले, निवडणूक आली की मुस्लिम हे पाकधार्जिणे असल्याचे सांगत राग निर्माण करायचा. हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करायचे आणि सत्ता जिंकायची असा आजवर अजेंडा राहिला आहे. देशात यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी जातीय दंगे झाले, तेथे भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये लागणारा निकाल हा २०१९ सालच्या निवडणुकीवर परिणाम करणारा असणार आहे.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अवि पानसरे व्याख्यानमालेत इरफान इंजिनिअर यांनी ‘जमातवाद आणि जातीय दंगे’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी आनंद मेणसे, प्रदीप निंबाळकर, ईर्शाद वडगावकर उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर